पाचोरा पाणी टंचाईचे सावट
रिपोटर चेतन सरोदे /प्रभाकर सरोदे
पूर्व भागात किंवा उत्तर-पूर्व भागात टंचाई कमी आहे. परंतु गिरणा पट्टा कोरडा झाला असून, शिवार उजाड होत आहेत. अनेक प्रकल्पांनी तळ गाठला असून, टंचाई वाढत आहे. जामनेरातील वाघूर व तोंडापूर या प्रकल्पांतही १०० टक्के जलसाठा होता. या भागात आजघडीला टंचाई कमी आहे. फक्त सातपुडा पर्वतातील काही भागात कृत्रीम टंचाई आहे. टंचाई दिवसागणिक वाढत आहे. कारण या भागातील कमाल प्रकल्प, तलाव कोरडे झाले आहेत. गिरणा नदीवरील नाशिक जिल्ह्यातील नांदगावात असलेल्या गिरणा धरणात यंदा फक्त ५६ टक्के जलसाठा होता.