Advertisement

नंदुरबार : भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.

नंदुरबार : भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.

नंदूरबार :- येथे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नंदूरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे.नंदूरबारमध्ये भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघात नेमका कसा झाला?

भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील जखमींना नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात चारचाकी वाहनांसह मोटरसायकलींचा चुराडा झाला आहे. ऐन दिवाळीत पाच जणांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!